पालघर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ( Rural Development Department ) वतीनं ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ ( Yashwantrao Chavan Panchayat Raj Abhiyan 2025 )अंतर्गत अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था, गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई इथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात सन २०२२-२३ साठी पालघर जिल्ह्यातल्या ( Palghar District ) मनोर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नितीन पवार आणि गोऱ्हे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दीपक पाटील दोन अधिकाऱ्यांना राज्यस्तरीय सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं.
ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सन्मान केला जातो. पालघर जिल्ह्यातून एकाच वेळी दोन अधिकाऱ्यांना सलग दोन वर्षे पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान वाढला आहे.
या कार्यक्रमाला राज्यपाल पी. सी. राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसचं ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे आणि गृहराज्यमंत्री (शहरे), पंचायत राज, योगेश कदम यांची ही विशेष उपस्थिती होती.