पालघर : गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षण व्यवस्थेची किल्ली आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस गावातल्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
पहा व्हिडीओ :
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस गावातल्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या नवं चिमुकल्यांचं स्वागत केलं.
दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना पाठय पुस्तकांचं वाटप हि केलं. तसचं त्यांनी शाळेतील औषधी वन उद्यानात विद्यार्थ्यां समवेत वृक्षारोपण देखील केलं. त्यांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधला.